Typhoid Needs Attention

टायफॉइड हा सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर स्वरुपाचा संसर्ग आहे.[1] हा एक प्रकारचा एंटेरिक फीव्हर असून तो दूषित अन्न व पाण्याद्वारे पसरतो.[2] हे जीवाणू फक्त माणसांमध्ये आढळतात आणि काही लोक त्यांच्या शरीरात कोणतीही लक्षणे न दाखवता अनेक वर्षे या जीवाणूंचे वहन करतात, ज्यामुळे ते अनवधानाने इतरांना संक्रमित करू शकतात. दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यास हे जीवाणू आतड्यांमध्ये प्रवेश करतात आतड्यांमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.[3] योग्य उपचार न केल्यास टायफॉइड गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो आणि जीवाला धोकादायक ठरू शकतो. हा आजार प्रामुख्याने 5 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.[4]

याचा फैलाव कसा होतो?

शेडिंग

टायफॉइडचा प्रसार ‘शेडिंग’ या प्रक्रियेद्वारे पसरतो, ज्यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या शौचातून सॅल्मोनेला टायफी जीवाणू शरीराबाहेर टाकले जातात. अशा व्यक्तीने अन्न किंवा पाण्याशी संपर्क साधला आणि त्याचे तुम्ही सेवन केले, तर तुम्हालाही टायफॉइड होऊ शकतो.[5]

अन्न वा पेय पोटात जाणे

जीवाणू पोटात गेल्यावर व्यक्ती आजारी पडतात. हे प्रामुख्याने दूषित खाद्यपदार्थ किंवा पाणी सेवन केल्याने होते. गटाराच्या पाण्याने दूषित झालेल्या अन्न किंवा पेयाच्या सेवनामुळे, दूषित पाण्यात धुतलेल्या ताटात जेवल्यास, किंवा स्वच्छता न राखणाऱ्या आणि शौचालय वापरल्यानंतर व्यक्तीने हात न धुता हाताळलल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने टायफॉइड होऊ शकतो.[6]

दूषित अन्न व पाणी

व्यवस्थित न धुतलेले किंवा शिजवलेले अन्नपदार्थ, जसे की फळं आणि सॅलड, तसेच, दूषित पिण्याच्या पाण्यातून, असुरक्षित बर्फाचे तुकडे किंवा असुरक्षित फळांचा रस, यामुळेही टायफॉइड होऊ शकतो. [7]

दीर्घकालीन वाहक

टायफॉइड झालेल्या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये हे जीवाणू वास्तव्यास असतात. ते वेळोवेळी शौचाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. काही वेळा टायफॉइडमधून बरे झालेल्या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये हे जीवाणू बराच काळ बाळगू शकतात. त्यांना लक्षणे जाणवत नसली तरी ते जीवाणू पसरवत राहू शकतात.[1]

धोका वाढवणारे घटक कोणते आहेत?

संशोधनानुसार, जगातील कदाचित निम्म्याहून अधिक टायफॉइडचे रुग्ण भारतात आहेत. समुदाय आणि रुग्णालयांच्या आकडेवारीच्या आधारे तसेच नोंद न झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, भारतात दरवर्षी अंदाजे १ कोटी टायफॉइड रुग्ण असण्याची शक्यता आहे.[8]

सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांना ताप, डोकेदुखी, मळमळ आणि पोटदुखी जाणवते. मात्र, वेळेत उपचार न केल्यास हा आजार गंभीर गुंतागुंतींचा कारणीभूत ठरू शकतो.[1]

टायफॉइडमुळे लहान आतड्यांमध्ये व्रण (अल्सर) होऊ शकतात, ज्यामुळे आतड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. काही गंभीर प्रकरणांमध्ये लहान आतड्यांच्या छिद्र पडलेल्या स्तराद्वारे टायफॉइड रक्तप्रवाहात प्रवेश करून सेप्सिसला कारणीभूत ठरतो. तसेच, काही रुग्णांमध्ये टायफॉइडमुळे हृदयाच्या आवरणात, स्वादुपिंडा किंवा मेंदूच्या आवरणात सू) निर्माण होऊ शकते आणि टायफॉइड मूत्रपिंडांवरही परिणाम करू शकतो.[7]

काही टायफॉइड रुग्णांमध्ये एन्सेफॅलोपॅथी, संभ्रम, झोपेचे विकार, मानसिक असंतुलन, भ्रम आणि स्नायूंच्या ताठरतेसारख्या न्यूरोलॉजिकल समस्या विकसित होऊ शकतात.[10]

टायफॉइडमुळे यकृत आणि प्लीहा वाढण्याची स्थिती, म्हणजेच हेपॅटो-स्प्लेनोमेगाली देखील होऊ शकते. 9 तसेच, टायफॉइडच्या जडलेल्या स्वरूपात दीर्घकालीन वाहक स्थितीमुळे पित्ताशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.[11]

स्रोत

अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Scroll to Top
This site is registered on wpml.org as a development site. Switch to a production site key to remove this banner.